Monday, 4 September 2017



 जेव्हा आपण - ‘माझ्या आयुष्यात जे काही होणार, ते सद्गुरुराया, तुझ्याच इच्छेने’ अशी मनोभूमिका ठेवतो, तेव्हा तो आपल्याला भरभरून देतो’, हा बापुभक्तांना नित्य येणारा अनुभव आहे. हा अनुभव कथन केलेली श्रद्धावान स्त्री प्रथम बापूभक्त नव्हती. तिला बापूभक्तीत असणारे सासर मिळाले. सासरच्यांचे पुरोगामी विचार बघून हळूहळू तिचीही बापूंवर श्रद्धा बसत गेली. पुढे तिच्या आयुष्यात जेव्हा एक वादळ आले, तेव्हा तिच्या सासरचे लोक - ‘जे काय होईल ती बापूंची इच्छा’ असे म्हणून तिला आधार देण्यास तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
अशा श्रद्धावानांना बापू टाकेलच कसा?
 - प्राजक्ता कुळकर्णी, भुसावळ
माझ्या आयुष्यातला बापूंचा हा सुंदर अनुभव. डिसेंबर २००९ मध्ये माझे लग्न झाले. सासर भुसावळ येथे असून सासरचे सर्वजण बापूभक्त आहेत. माझे मिस्टर औरंगाबाद येथे जॉब करत असल्यामुळे आम्ही दोघेच औरंगाबाद येथे रहात होतो. मला लग्नापूर्वी बापूंबद्दल काही माहिती नव्हती.

लग्न होऊन काही महिन्यांतच मला दिवस गेले. डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो. मात्र चेकअपचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ‘‘पोटात गाठ असल्यामुळे अ‍ॅबॉर्शन करावं लागणार.’’ हे ऐकून आमचे धाबे दणाणले. घरातील मोठी सून असल्यामुळे पहिलंच बाळ घरात येणार या आनंदात घरचे सगळे होते, पण हे ऐकून त्या आनंदावर विरजण पडणार होते. आता सासरी काय व कसे सांगणार आणि ते हा धक्का कसा सहन करतील ह्या विचारात मी पडले.

डॉक्टरांच्या मते आमच्याकडे विचार करण्यास २-३ आठवड्यांचा कालावधी होता. त्यादरम्यानच दिवाळी असल्यामुळे दिवाळी झाल्यावर अ‍ॅबॉर्शन करण्याचे ठरवून आम्ही दिवाळीकरिता भुसावळला आलो व मन घट्ट करून घडलेला सर्व प्रसंग सासू सासर्‍यांना सांगितला व आता काय प्रतिक्रिया येईल त्याची वाट बघत बसलो. पण सुदैवाने माझ्या सासरची माणसे कट्टर बापूभक्त आहेत आणि ‘श्रद्धावानांच्या जीवनात जे काही होते ते सद्गुरुंच्या इच्छेने’ ह्या मतावर ठाम असतात. त्यामुळे बापूंनीच हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांना दिली. त्यामुळे हे ऐकल्यावर घरच्या सार्‍यांना दुःख जरी झाले असले तरी कुठलीही आक्रस्ताळी प्रतिक्रिया उमटली नाही. सासरे फक्त - ‘आता जे होणार ती बापूंची इच्छा’ एवढेच म्हणाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे दीर मुकेशसिंह कुळकर्णी यांनी आमच्या घरी परमपूज्य बापूंचे पादुकापूजन आयोजित करवून, ते आम्हां दोघांकडून करून घेतले. तेदेखील हेच म्हणाले की ‘बापू जे योग्य ते नक्की करतील. ते आहेतच आपल्यासोबत!’ ह्या अशा प्रतिक्रियेमुळे, मनाला दुःख जरी झाले असले तरी टेन्शन दूर झाले होते.

दिवाळीनंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो व त्यांच्याशी ऑपरेशन संदर्भात चर्चा केली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा चेकअप केले. रिपोर्ट आला.

तो वाचून डॉक्टरांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! ते पुन्हा पुन्हा रिपोर्ट वाचत होते. त्यांनी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी माझ्या मिस्टरांना विचारले, ‘‘तुम्ही मधल्या काळात काही ट्रीटमेंट अथवा ऑपरेशन केलेत का? कारण आधीच्या रिपोर्टमध्ये दिसत असलेली गाठ आता नाहीशी झाली आहे आणि पोटातला गर्भसुद्धा व्यवस्थित आहे. त्यामुळे आता तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता. अ‍ॅबॉर्शनची काहीच आवश्यकता नाही!’’

हे ऐकून आम्हा दोघांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ‘मी तुला कधीच टाकणार नाही’ ही बापूंनी सर्व श्रद्धावानांना दिलेली ग्वाही माझ्या बाबतीत खरी करून दाखवली होती.

खरंच, मातृत्वाचे सुख मी बापूंच्या कृपेने अनुभवू शकले.

यथावकाश डिलिव्हरी होऊन मला मुलगा झाला.

आता माझा मुलगा ‘श्‍लोक’ २ वर्षाचा झाला आहे व पूर्णपणे निरोगी आहे. आमच्यासमोर हा बापूंच्या कृपेचा अनमोल ठेवाच आहे. खरंच,

एक विश्‍वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा

ही खूणगाठ मनाशी बांधली की तो सद्गुरु मग आपल्याला सगळ्यातूनच तारून नेतो.
आम्हां सर्वांकडून बापूंची भक्ती आणि सेवा अखंड घडो, हीच बापुचरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

04:03 samirsinh dattopadhye


 जेव्हा आपण - ‘माझ्या आयुष्यात जे काही होणार, ते सद्गुरुराया, तुझ्याच इच्छेने’ अशी मनोभूमिका ठेवतो, तेव्हा तो आपल्याला भरभरून देतो’, हा बापुभक्तांना नित्य येणारा अनुभव आहे. हा अनुभव कथन केलेली श्रद्धावान स्त्री प्रथम बापूभक्त नव्हती. तिला बापूभक्तीत असणारे सासर मिळाले. सासरच्यांचे पुरोगामी विचार बघून हळूहळू तिचीही बापूंवर श्रद्धा बसत गेली. पुढे तिच्या आयुष्यात जेव्हा एक वादळ आले, तेव्हा तिच्या सासरचे लोक - ‘जे काय होईल ती बापूंची इच्छा’ असे म्हणून तिला आधार देण्यास तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
अशा श्रद्धावानांना बापू टाकेलच कसा?
 - प्राजक्ता कुळकर्णी, भुसावळ
माझ्या आयुष्यातला बापूंचा हा सुंदर अनुभव. डिसेंबर २००९ मध्ये माझे लग्न झाले. सासर भुसावळ येथे असून सासरचे सर्वजण बापूभक्त आहेत. माझे मिस्टर औरंगाबाद येथे जॉब करत असल्यामुळे आम्ही दोघेच औरंगाबाद येथे रहात होतो. मला लग्नापूर्वी बापूंबद्दल काही माहिती नव्हती.

लग्न होऊन काही महिन्यांतच मला दिवस गेले. डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो. मात्र चेकअपचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ‘‘पोटात गाठ असल्यामुळे अ‍ॅबॉर्शन करावं लागणार.’’ हे ऐकून आमचे धाबे दणाणले. घरातील मोठी सून असल्यामुळे पहिलंच बाळ घरात येणार या आनंदात घरचे सगळे होते, पण हे ऐकून त्या आनंदावर विरजण पडणार होते. आता सासरी काय व कसे सांगणार आणि ते हा धक्का कसा सहन करतील ह्या विचारात मी पडले.

डॉक्टरांच्या मते आमच्याकडे विचार करण्यास २-३ आठवड्यांचा कालावधी होता. त्यादरम्यानच दिवाळी असल्यामुळे दिवाळी झाल्यावर अ‍ॅबॉर्शन करण्याचे ठरवून आम्ही दिवाळीकरिता भुसावळला आलो व मन घट्ट करून घडलेला सर्व प्रसंग सासू सासर्‍यांना सांगितला व आता काय प्रतिक्रिया येईल त्याची वाट बघत बसलो. पण सुदैवाने माझ्या सासरची माणसे कट्टर बापूभक्त आहेत आणि ‘श्रद्धावानांच्या जीवनात जे काही होते ते सद्गुरुंच्या इच्छेने’ ह्या मतावर ठाम असतात. त्यामुळे बापूंनीच हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांना दिली. त्यामुळे हे ऐकल्यावर घरच्या सार्‍यांना दुःख जरी झाले असले तरी कुठलीही आक्रस्ताळी प्रतिक्रिया उमटली नाही. सासरे फक्त - ‘आता जे होणार ती बापूंची इच्छा’ एवढेच म्हणाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे दीर मुकेशसिंह कुळकर्णी यांनी आमच्या घरी परमपूज्य बापूंचे पादुकापूजन आयोजित करवून, ते आम्हां दोघांकडून करून घेतले. तेदेखील हेच म्हणाले की ‘बापू जे योग्य ते नक्की करतील. ते आहेतच आपल्यासोबत!’ ह्या अशा प्रतिक्रियेमुळे, मनाला दुःख जरी झाले असले तरी टेन्शन दूर झाले होते.

दिवाळीनंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो व त्यांच्याशी ऑपरेशन संदर्भात चर्चा केली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा चेकअप केले. रिपोर्ट आला.

तो वाचून डॉक्टरांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! ते पुन्हा पुन्हा रिपोर्ट वाचत होते. त्यांनी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी माझ्या मिस्टरांना विचारले, ‘‘तुम्ही मधल्या काळात काही ट्रीटमेंट अथवा ऑपरेशन केलेत का? कारण आधीच्या रिपोर्टमध्ये दिसत असलेली गाठ आता नाहीशी झाली आहे आणि पोटातला गर्भसुद्धा व्यवस्थित आहे. त्यामुळे आता तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता. अ‍ॅबॉर्शनची काहीच आवश्यकता नाही!’’

हे ऐकून आम्हा दोघांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ‘मी तुला कधीच टाकणार नाही’ ही बापूंनी सर्व श्रद्धावानांना दिलेली ग्वाही माझ्या बाबतीत खरी करून दाखवली होती.

खरंच, मातृत्वाचे सुख मी बापूंच्या कृपेने अनुभवू शकले.

यथावकाश डिलिव्हरी होऊन मला मुलगा झाला.

आता माझा मुलगा ‘श्‍लोक’ २ वर्षाचा झाला आहे व पूर्णपणे निरोगी आहे. आमच्यासमोर हा बापूंच्या कृपेचा अनमोल ठेवाच आहे. खरंच,

एक विश्‍वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा

ही खूणगाठ मनाशी बांधली की तो सद्गुरु मग आपल्याला सगळ्यातूनच तारून नेतो.
आम्हां सर्वांकडून बापूंची भक्ती आणि सेवा अखंड घडो, हीच बापुचरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

Saturday, 2 September 2017

Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥
05:02 samirsinh dattopadhye
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥

Friday, 1 September 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥
03:49 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥

Thursday, 31 August 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥
02:36 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥

Monday, 28 August 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥
01:28 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥

Thursday, 24 August 2017

Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥
02:18 samirsinh dattopadhye
Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥

Monday, 9 March 2015



Sadguru Shri Aniruddha Bapu Jalgaon Visit Video - 2

Aniruddha Bapu Visit, happiness, visit, Eklavya Krida Sankul’s Sports Ground, Sadguru, Discourse, Jalgaon, AADM
Shree Aniruddha Anandostav

16:30 samirsinh dattopadhye


Sadguru Shri Aniruddha Bapu Jalgaon Visit Video - 2

Aniruddha Bapu Visit, happiness, visit, Eklavya Krida Sankul’s Sports Ground, Sadguru, Discourse, Jalgaon, AADM
Shree Aniruddha Anandostav