Showing posts with label Discourse. Show all posts
Showing posts with label Discourse. Show all posts

Monday 9 March 2015

रविवारी दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात अनिरुद्ध बापू बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत,साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.

 बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना अनिरुद्ध अ‍ॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हीने परेड करत बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.

 मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. 

·  बापूंच्या प्रवचनातील काही ठळक मुद्दे:

आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग हे कसे करायचेमग हे कसे होईलयातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून ज्याला उत्तर मिळते तो सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न  जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.

 आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो कायआणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

 प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्‍वास वाढला असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्‍यांचा मात्र आत्मविश्‍वास वाढतो.

 जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्‍याचा ढोल वाजतच राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..

 आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे. 

 जे परमेश्‍वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.

   ■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही. 


  ■  जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिकानामस्मरण करा.

मनात भीती ठेवून भक्ती करू नकामनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्‍यांमध्येच ताकद असते. देवावर विश्‍वास असेल तर तुमचाही आत्मविश्‍वास वाढेल.. 
आपल्यावर कितीही संकटे आली तरी देव संकटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हाच परमेश्‍वरावरील विश्‍वास होय. तोच आत्मविश्‍वास होय. तुमचा देवावर विश्‍वास पाहिजे. तरच तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. जसा आत्मविश्‍वासवाढेल तसे तुम्हाला फळ मिळेल. स्वत:ला कमी लेखू नका. जीवनात संकटे येत राहतील. 
Sadguru Shree Aniruddha Bapu
  • आत्मविश्‍वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्‍वास लागतो. आत्मविश्‍वास वाढवायचा असेल तर परमेश्‍वरावरील विश्‍वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्‍वास होय.
  • जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्‍वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजेनाम.
परमेश्‍वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवूनआणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.

असा आत्मविश्‍वास अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला…………

प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले कीजीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका..

 भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्‍वास असावा पुरता ..”
00:26 samirsinh dattopadhye
रविवारी दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात अनिरुद्ध बापू बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत,साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.

 बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना अनिरुद्ध अ‍ॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हीने परेड करत बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.

 मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. 

·  बापूंच्या प्रवचनातील काही ठळक मुद्दे:

आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग हे कसे करायचेमग हे कसे होईलयातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून ज्याला उत्तर मिळते तो सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न  जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.

 आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो कायआणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

 प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्‍वास वाढला असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्‍यांचा मात्र आत्मविश्‍वास वाढतो.

 जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्‍याचा ढोल वाजतच राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..

 आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे. 

 जे परमेश्‍वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.

   ■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही. 


  ■  जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिकानामस्मरण करा.

मनात भीती ठेवून भक्ती करू नकामनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्‍यांमध्येच ताकद असते. देवावर विश्‍वास असेल तर तुमचाही आत्मविश्‍वास वाढेल.. 
आपल्यावर कितीही संकटे आली तरी देव संकटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हाच परमेश्‍वरावरील विश्‍वास होय. तोच आत्मविश्‍वास होय. तुमचा देवावर विश्‍वास पाहिजे. तरच तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. जसा आत्मविश्‍वासवाढेल तसे तुम्हाला फळ मिळेल. स्वत:ला कमी लेखू नका. जीवनात संकटे येत राहतील. 
Sadguru Shree Aniruddha Bapu
  • आत्मविश्‍वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्‍वास लागतो. आत्मविश्‍वास वाढवायचा असेल तर परमेश्‍वरावरील विश्‍वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्‍वास होय.
  • जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्‍वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजेनाम.
परमेश्‍वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवूनआणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.

असा आत्मविश्‍वास अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला…………

प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले कीजीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका..

 भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्‍वास असावा पुरता ..”