Showing posts with label Dhule-Anubhav-Kathan. Show all posts
Showing posts with label Dhule-Anubhav-Kathan. Show all posts

Friday 1 September 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥
03:49 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥

Thursday 31 August 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥
02:36 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥

Monday 9 March 2015

Aniruddha Bapu Anubhav

स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते

 - दंगल वाघ, धुळे   

माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्‍या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.

१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्‍या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्‍या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्‍हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्‍या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.

एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.

मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.

मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्‍चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.

रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!

माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥
00:10 samirsinh dattopadhye
Aniruddha Bapu Anubhav

स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते

 - दंगल वाघ, धुळे   

माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्‍या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.

१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्‍या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्‍या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्‍हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्‍या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.

एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.

मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.

मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्‍चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.

रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!

माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥