Thursday 14 September 2017


संकटे कोणाला टळली आहेत? ज्याला त्याला आपापल्या प्रारब्धाप्रमाणे विविध संकटांशी सामना करावाच लागतो. पण बापूंच्या छत्रछायेखाली असलेल्या श्रद्धावानांचा हा नेहमीचा अनुभव आहे की संकटात त्यांना आपोआप मनःसामर्थ्य मिळत जाते, आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध होत राहते. इतकेच नव्हे, तर संकटामध्ये जर नुकसान झाल्यासारखे वाटले, तर त्यातूनही कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचा फायदाच झालेला असतो.
- शरद पाटील, नंदुरबार
 
गेली काही वर्षे बोअरवेलचे पाणी खूप कमी झाल्यामुळे मला शेतीत दरवर्षी खूप नुकसान होत होते. पुढे २००१ पासून बापूंच्या छत्रछायेत आलो. इतर बापूभक्तांना आलेले बापूंच्या कृपाप्रसादाचे अनुभव वाचत, ऐकत होतो. काही दिवसांपूर्वी ‘कृपासिंधु’ मासिकात आलेल्या एका भक्ताचा अनुभव माझ्या पत्नीने वाचला व ती मला म्हणाली की ‘‘त्या भक्ताने बापूंचे पादुकापूजन केले होते. त्या पादुकापूजनाचे जे निर्माल्य निघाले होते ते त्यांनी त्यांच्या कोरड्या विहिरीत टाकले आणि काय आश्चर्य, एवढे महिने ठणठणीत कोरडी असणार्‍या त्यांच्या विहिरीला चक्क पाणी आले.’’
हा अनुभव ऐकून मलाही माझ्या अशाच तर्‍हेच्या समस्येबाबत हुरूप आला.

पुढे मार्गशीर्ष महिन्यातल्या ‘सच्चिदानंदोत्सवात आम्हीही पादुका घरी आणल्या. छानपैकी पूजन झाले. माझ्या मनात त्या बापूभक्ताचा अनुभव होताच. पूजन झाल्यावर दुसर्‍या दिवशी आम्हीदेखील त्या पादुकांना अर्पण केलेल्या फुलांचे निर्माल्य आमच्या कोरड्या विहीरीत टाकले. विहीरीजवळच बोअरवेल आहे. हे करताना मी मनोमन बापूंची प्रार्थना केली, ‘बापू, खरं तर ही मी माझ्याच वाईट प्रारब्धाची फळे भोगत आहे आणि तरीदेखील तुम्हाला विनवतो आहे, तुम्हाला त्रास देत आहे.’

परंतु काही केल्या बोअरवेलमध्ये मोटर टाकून पाणी टेस्ट करण्याची हिम्मत होत नव्हती. थोड्या दिवसांनी माझ्या मुलाने बोअरवेलमध्ये मोटर टाकून पाहिली तर बापुकृपेने बोअरचे पाणी आधीपेक्षा खूपच चांगले निघाले.

....आणि ह्यानंतर तर आमच्या जीवनात बापूंच्या अनुभवांची शृंखलाच सुरू झाली. जीवनामध्ये अडचणी कोणाला चुकल्या आहेत? तशा त्या आम्हालाही येतात, पण आता ‘बापू आपली काळजी घेणार’ हे माहीत असल्यामुळे अडचणींशी झुंजताना पूर्वीसारखे हतबल वाटत नाही.

तसे पाहिले तर मी एक सामान्य शेतकरी आहे. ऑक्टोबर २०११ मध्ये आपल्या अधिवेशनासाठी आम्ही पतीपत्नी मुंबईला आलो असता, अधिवेशनादरम्यानच माझ्या मुलाचा फोन आला की ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे आपला मोटर पंप बंद आहे.

मुलाचा फोन ऐकून मला खूप टेन्शन आले. ‘हे काय होऊन बसले, आता कसे होणार’ असा विचार माझ्या मनात घर करून राहिला. ऑक्टोबर हीट चालू असल्यामुळे पपईच्या पिकाला पाणी देणे खूपच आवश्यक होते व ऐनवेळी पिकाला पाणी न मिळणे म्हणजे आम्हाला खूप नुकसान होणार होते. आधीच पाणी द्यायला उशीर झाला होता व त्यात हे संकट ओढवले!

पण तितक्यात माझ्या मनात विचार आला की संकटापेक्षा माझा सद्गुरू मोठा आहे....नक्कीच. मग आपण घाबरतोय कशाला? असा निश्‍चय करून थोड्या वेळाने मी रिलॅक्स झालो.

मनोमन बापूंना म्हणालो, ‘बापू, आता तुम्ही शेतात पाऊस पाडता की आणखी काही जादू करता....तारणे की मारणे सर्व तुमच्या हातात आहे.’

अधिवेशन संपल्यावर घरी आलो, तेव्हा शेजारील शेतकरी घरी येऊन मला सांगू लागला की माझ्या शेतात तुमचे पाणी फुटले आहे; पेरणीसाठी मला अडचण येईल, तरी तुम्ही ते पाणी प्रथम बंद करा.

पाणी? आणि माझ्या शेतातून? कसे शक्य आहे? आमचा मोटरपंप तर बंदच होता.

‘‘कदाचित दुसर्‍या कोणाचीतरी पाईपलाईन लीक असेल, कारण ४-५ दिवसांपासून माझी मोटर बंदच आहे’’, असे मी त्याला सांगितले.

पण नंतर मुलाला विचारले तर त्याने भीत भीत सांगितले की मी मोटर चालू करून पाहिली तर कशी कोण जाणे, पण मोटर चालू झाली व हळूहळू का होईना, पिकाला पाणी मिळाले.
पण ट्रान्सफॉर्मर जळला असताना मोटर चालू होईलच कशी? हे काय गौडबंगाल! ह्याबद्दल वायरमनला विचारले. त्यानेही तेच सांगितले की हे शक्यच नाही. ट्रान्सफॉर्मरशिवाय मोटर चालूच शकत नाही व तसा प्रयत्न केल्यास मोटरपंप खराब होऊ शकतो.

ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे आजूबाजूच्या कुणाही शेतकर्‍याने मोटर चालू केली नव्हती व नवीन ट्रान्सफॉर्मर एक महिना मिळू शकणार नव्हता. ‘‘मोटर खराब झाली असती तर तुम्ही मला रागवणार ह्या भीतीने मी तुम्हाला सांगितले नाही व मोटर चालू ठेवली’’ असे माझ्या मुलाने सांगितले.

हे सर्व ऐकून मी खूपच भारावलो. माझी सगळी चिंता बापूंनीच दूर केली. ट्रान्सफॉर्मरशिवाय मोटर चालत असूनही मोटर खराब झाली नाही. शिवाय नवीन ट्रान्सफॉर्मरही ८ दिवसांतच मिळाला.
अजून अनुभव संपला नाही. बापूंच्या छत्रछायेत असताना श्रद्धावानावर जी संकटे येतात, तीदेखील त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदाच करून जातात, हे आम्ही अनुभवले.
त्याचे झाले असे की ह्या सर्व गडबडीत थोडा पाण्याचा ताण बसल्यामुळे पपई उशीरा निघणार होती. पण म्हटले उशीरा तर उशीरा, पपई वाचली तरी, असे म्हणून आम्ही स्वतःचे समाधान करून घेतले. पण पुढे गोष्ट अशी झाली की ज्या शेतकर्‍यांची लवकर पपई निघाली, त्यांना खूप कमी भाव म्हणजे फक्त दोन रुपये प्रति किलो प्रमाणे मिळाला. माझे धाबे दणाणले. मी बापूंना मनात म्हणालो, ‘बापू, एकतर भाव कमी, त्यात आमची पपई निघेपर्यंत तर खूपच भाव कमी होईल. पण त्यामुळे होणारे नुकसान सहन करण्याची शक्ती मला द्या.’
परंतु बापूंना आमचे नुकसान मान्य नव्हते!

जेव्हा आमची पपई निघाली तेव्हापासून बरोबर पपईचा भाव वाढला आणि आम्हाला चार रुपये प्रति किलो दराने भाव मिळाला आणि होणारे मोठेच नुकसान टळले.

अशी बापू आमच्यावर येणार्‍या संकटाआधीच, संकटनिवारणाचीही सोय करून ठेवतात.

॥ हरि ॐ ॥

03:02 samirsinh dattopadhye

संकटे कोणाला टळली आहेत? ज्याला त्याला आपापल्या प्रारब्धाप्रमाणे विविध संकटांशी सामना करावाच लागतो. पण बापूंच्या छत्रछायेखाली असलेल्या श्रद्धावानांचा हा नेहमीचा अनुभव आहे की संकटात त्यांना आपोआप मनःसामर्थ्य मिळत जाते, आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध होत राहते. इतकेच नव्हे, तर संकटामध्ये जर नुकसान झाल्यासारखे वाटले, तर त्यातूनही कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचा फायदाच झालेला असतो.
- शरद पाटील, नंदुरबार
 
गेली काही वर्षे बोअरवेलचे पाणी खूप कमी झाल्यामुळे मला शेतीत दरवर्षी खूप नुकसान होत होते. पुढे २००१ पासून बापूंच्या छत्रछायेत आलो. इतर बापूभक्तांना आलेले बापूंच्या कृपाप्रसादाचे अनुभव वाचत, ऐकत होतो. काही दिवसांपूर्वी ‘कृपासिंधु’ मासिकात आलेल्या एका भक्ताचा अनुभव माझ्या पत्नीने वाचला व ती मला म्हणाली की ‘‘त्या भक्ताने बापूंचे पादुकापूजन केले होते. त्या पादुकापूजनाचे जे निर्माल्य निघाले होते ते त्यांनी त्यांच्या कोरड्या विहिरीत टाकले आणि काय आश्चर्य, एवढे महिने ठणठणीत कोरडी असणार्‍या त्यांच्या विहिरीला चक्क पाणी आले.’’
हा अनुभव ऐकून मलाही माझ्या अशाच तर्‍हेच्या समस्येबाबत हुरूप आला.

पुढे मार्गशीर्ष महिन्यातल्या ‘सच्चिदानंदोत्सवात आम्हीही पादुका घरी आणल्या. छानपैकी पूजन झाले. माझ्या मनात त्या बापूभक्ताचा अनुभव होताच. पूजन झाल्यावर दुसर्‍या दिवशी आम्हीदेखील त्या पादुकांना अर्पण केलेल्या फुलांचे निर्माल्य आमच्या कोरड्या विहीरीत टाकले. विहीरीजवळच बोअरवेल आहे. हे करताना मी मनोमन बापूंची प्रार्थना केली, ‘बापू, खरं तर ही मी माझ्याच वाईट प्रारब्धाची फळे भोगत आहे आणि तरीदेखील तुम्हाला विनवतो आहे, तुम्हाला त्रास देत आहे.’

परंतु काही केल्या बोअरवेलमध्ये मोटर टाकून पाणी टेस्ट करण्याची हिम्मत होत नव्हती. थोड्या दिवसांनी माझ्या मुलाने बोअरवेलमध्ये मोटर टाकून पाहिली तर बापुकृपेने बोअरचे पाणी आधीपेक्षा खूपच चांगले निघाले.

....आणि ह्यानंतर तर आमच्या जीवनात बापूंच्या अनुभवांची शृंखलाच सुरू झाली. जीवनामध्ये अडचणी कोणाला चुकल्या आहेत? तशा त्या आम्हालाही येतात, पण आता ‘बापू आपली काळजी घेणार’ हे माहीत असल्यामुळे अडचणींशी झुंजताना पूर्वीसारखे हतबल वाटत नाही.

तसे पाहिले तर मी एक सामान्य शेतकरी आहे. ऑक्टोबर २०११ मध्ये आपल्या अधिवेशनासाठी आम्ही पतीपत्नी मुंबईला आलो असता, अधिवेशनादरम्यानच माझ्या मुलाचा फोन आला की ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे आपला मोटर पंप बंद आहे.

मुलाचा फोन ऐकून मला खूप टेन्शन आले. ‘हे काय होऊन बसले, आता कसे होणार’ असा विचार माझ्या मनात घर करून राहिला. ऑक्टोबर हीट चालू असल्यामुळे पपईच्या पिकाला पाणी देणे खूपच आवश्यक होते व ऐनवेळी पिकाला पाणी न मिळणे म्हणजे आम्हाला खूप नुकसान होणार होते. आधीच पाणी द्यायला उशीर झाला होता व त्यात हे संकट ओढवले!

पण तितक्यात माझ्या मनात विचार आला की संकटापेक्षा माझा सद्गुरू मोठा आहे....नक्कीच. मग आपण घाबरतोय कशाला? असा निश्‍चय करून थोड्या वेळाने मी रिलॅक्स झालो.

मनोमन बापूंना म्हणालो, ‘बापू, आता तुम्ही शेतात पाऊस पाडता की आणखी काही जादू करता....तारणे की मारणे सर्व तुमच्या हातात आहे.’

अधिवेशन संपल्यावर घरी आलो, तेव्हा शेजारील शेतकरी घरी येऊन मला सांगू लागला की माझ्या शेतात तुमचे पाणी फुटले आहे; पेरणीसाठी मला अडचण येईल, तरी तुम्ही ते पाणी प्रथम बंद करा.

पाणी? आणि माझ्या शेतातून? कसे शक्य आहे? आमचा मोटरपंप तर बंदच होता.

‘‘कदाचित दुसर्‍या कोणाचीतरी पाईपलाईन लीक असेल, कारण ४-५ दिवसांपासून माझी मोटर बंदच आहे’’, असे मी त्याला सांगितले.

पण नंतर मुलाला विचारले तर त्याने भीत भीत सांगितले की मी मोटर चालू करून पाहिली तर कशी कोण जाणे, पण मोटर चालू झाली व हळूहळू का होईना, पिकाला पाणी मिळाले.
पण ट्रान्सफॉर्मर जळला असताना मोटर चालू होईलच कशी? हे काय गौडबंगाल! ह्याबद्दल वायरमनला विचारले. त्यानेही तेच सांगितले की हे शक्यच नाही. ट्रान्सफॉर्मरशिवाय मोटर चालूच शकत नाही व तसा प्रयत्न केल्यास मोटरपंप खराब होऊ शकतो.

ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे आजूबाजूच्या कुणाही शेतकर्‍याने मोटर चालू केली नव्हती व नवीन ट्रान्सफॉर्मर एक महिना मिळू शकणार नव्हता. ‘‘मोटर खराब झाली असती तर तुम्ही मला रागवणार ह्या भीतीने मी तुम्हाला सांगितले नाही व मोटर चालू ठेवली’’ असे माझ्या मुलाने सांगितले.

हे सर्व ऐकून मी खूपच भारावलो. माझी सगळी चिंता बापूंनीच दूर केली. ट्रान्सफॉर्मरशिवाय मोटर चालत असूनही मोटर खराब झाली नाही. शिवाय नवीन ट्रान्सफॉर्मरही ८ दिवसांतच मिळाला.
अजून अनुभव संपला नाही. बापूंच्या छत्रछायेत असताना श्रद्धावानावर जी संकटे येतात, तीदेखील त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदाच करून जातात, हे आम्ही अनुभवले.
त्याचे झाले असे की ह्या सर्व गडबडीत थोडा पाण्याचा ताण बसल्यामुळे पपई उशीरा निघणार होती. पण म्हटले उशीरा तर उशीरा, पपई वाचली तरी, असे म्हणून आम्ही स्वतःचे समाधान करून घेतले. पण पुढे गोष्ट अशी झाली की ज्या शेतकर्‍यांची लवकर पपई निघाली, त्यांना खूप कमी भाव म्हणजे फक्त दोन रुपये प्रति किलो प्रमाणे मिळाला. माझे धाबे दणाणले. मी बापूंना मनात म्हणालो, ‘बापू, एकतर भाव कमी, त्यात आमची पपई निघेपर्यंत तर खूपच भाव कमी होईल. पण त्यामुळे होणारे नुकसान सहन करण्याची शक्ती मला द्या.’
परंतु बापूंना आमचे नुकसान मान्य नव्हते!

जेव्हा आमची पपई निघाली तेव्हापासून बरोबर पपईचा भाव वाढला आणि आम्हाला चार रुपये प्रति किलो दराने भाव मिळाला आणि होणारे मोठेच नुकसान टळले.

अशी बापू आमच्यावर येणार्‍या संकटाआधीच, संकटनिवारणाचीही सोय करून ठेवतात.

॥ हरि ॐ ॥

Friday 8 September 2017

Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

श्रद्धावानांच्या मनातील सर्व उचित, पवित्र इच्छा ते सद्गुरुतत्त्व पूर्ण करतंच, असा श्रद्धावानांचा अनुभव आहे. आणि एकदा एखाद्या श्रद्धावानाच्या मनातील एखादी उचित, पवित्र इच्छा पूर्ण व्हावी असा ‘संकल्प’ त्या ‘सत्यसंकल्प’ सद्गुरुंनी केला की मग ती इच्छा पूर्ण होण्याच्या आड येणार्‍या अनेक गोष्टी मग आश्‍चर्यकारकरित्या आपोआप बाजूला होतात.
- सेजलवीरा भट, नंदुरबार 



‘तू’ आणि ‘मी’ मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीही नाही....हे श्रद्धावानाला दिलेलं वचन बापू पाळतोच पाळतो. याची प्रचिती देणारा हा अनुभव बापू चरणी अर्पित करते.

परमपूज्य बापूंना ‘सुंदरकांड’ आवडतं. रामायणातील ह्या सर्वांत सुंदर भागाचे रसग्रहण श्रद्धावानांनाही करता यावे ह्याकरिता बापूंनी आपल्या ‘दैनिक प्रत्यक्ष’ मधून सुंदरकांडावर मराठीतून ‘तुलसीपत्र’ ही अग्रलेखमालिकाही मराठी व हिंदीतून चालू केली. म्हणून आपणही बापूंचे पादुकापूजन करून, त्यासमवेत सुंदरकांड पठणासहित बापूंचं गुणसंकीर्तन करावं अशी इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. याविषयी मी आमच्या इथल्या अनिरुद्ध उपासनाकेंद्रातील काही महिलाभक्तांनाही सांगितलं. त्यांनाही माझा हा विचार खूप आवडला. पण पुढे प्रश्न होता - हे सर्व होणार कसं आणि कधी ?

हा विचार करत अनेक दिवस गेले. अखेर श्रावण सुरू झाला आणि सोबत दरवर्षीप्रमाणे सर्व भक्तांकडे साखळी पादुकापूजन करण्यास सुरुवात झाली. मी मात्र हा सगळा कार्यक्रम एकदम करायचा असल्याने ह्या साखळी पादुकापूजनाकरिता नाव दिले नाही. पण आता माझ्या मनात असलेल्या इच्छेने आणखीनच जोर धरला होता. अर्थात मिस्टर कितपत राजी होतील, ही शंकादेखील होतीच. असो, जे काय होईल ते बापूंच्याच इच्छेने अशी मी मनाची समजूत काढली.

एक दिवस रात्री हे सर्व बापूंशी मनात बोलता बोलता झोपून गेले. सकाळी जाग आली ती कानावर पडलेल्या एका भजनाच्या आवाजाने. उठून खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक साधु ते भजन गात होता. हा दिवस होता शनिवारचा. त्या साधुपुरुषाने ते भजन माझ्या घराच्या परिसरात बर्‍याच वेळपर्यंत म्हटलं व नंतर तो कुठे गेला कळलंच नाही. त्या भजनाने एक उभारी आल्यासारखं वाटलं. मनात जी मिस्टरांना सुंदरकांड व पादुकापूजनाविषयी सांगण्याची भीती होती ती जवळपास नाहीशीच झाली. फेश झाल्यावर मनाशी ठाम निश्‍चय करून त्यांना मी माझी कल्पना सांगितली....आणि काय आश्चर्य! त्यांनी सुंदरकांड व पादुका पूजन करण्यास होकार दिला व सुंदरकांड म्हणणार्‍या एका भजनी मंडळाच्या प्रमुखांशी बोलून वार, तारीख व खर्चाविषयी विचारपूस करण्यासाठी सांगितले. तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही. बापूंचे मी मनातल्या मनात आभार मानले. हे सर्व बापूच घडवत आहेत व सकाळी भजन म्हणणारा साधू पुरुष दुसरा कोणी नसून माझे ‘बापूच’ होते असा विश्‍वास मला वाटू लागला.

खरंच बापूराया, तू प्रत्येक भक्ताच्या मनातलं जाणतोसच जाणतोस!

मी ओळखीच्या एका व्यक्तीला सुंदरकांडाचे गायन करणार्‍या मंडळाची व त्यांच्या प्रमुखांची माहिती काढण्यास सांगितले. अशा एका मंडळाविषयी माहिती व त्यांच्या प्रमुखांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळताच मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले, ‘‘आम्ही सुंदरकांड फक्त शनिवारी करतो व तेदेखील सायंकाळी ६.३० ते १०.०० ह्या वेळात.’’ शनिवारी सायंकाळी? आपल्या उपासनेच्या वेळेत? कसं शक्य होणार?

मग मी त्यांना आपल्या शनिवारच्या अनिरुद्ध उपासनेबद्दल सांगून, दुसरी वेळ देण्यास सांगितली. पण आपण शनिवारखेरीज अन्य दिवशी कार्यक्रम करत नसल्याचे सांगून, उलट आम्हालाच उपासनेचा दिवस बदलण्याविषयी त्यांनी सांगितले. ते अर्थातच शक्य नव्हते. काय करावे काही सुचत नव्हते. कार्यक्रम सोडून द्यावा लागणार की काय ह्या कल्पनेने मला खूपच टेन्शन आले. मग मनातून बापूंनाच हाक मारली. मनात बापूंचं नाव घेत मी त्यांना समजावून सांगितलं, ‘‘आम्ही शनिवारची उपासना चेंज नाही करू शकत. ते आमच्या हातात नाही. शनिवारची उपासना ही आमच्या सद्गुरु अनिरुद्ध बापूंकडूनच ठरलेली आहे.’’ असं सांगत त्यांना थोडक्यात बापूंची माहितीही सांगितली.

बापूंनी त्यांचे कार्य सुरू केले होते. ह्या माझ्या वक्तव्यानंतर त्या सत्संग प्रमुखांच्या मनात थोडी चलबिचल झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले. त्यांना बापूंविषयी थोडीबहुत माहिती होती व आपल्या बापुपरिवाराबद्दल त्यांचे मतही चांगले होते.

त्यामुळे पुढे ते म्हणाले, ‘‘आज शनिवार आहे. द्वारकाधीश मंदिरात सुंदरकांडपठणाचा कार्यक्रम आहे. तुम्ही तेथे या. माझ्यासोबत जे इतर सहकारी आहेत, त्यांना विचारून सांगतो. तुम्ही त्यांना सर्व समजावून सांगा की ‘माझी तुमच्याकडून सुंदरकांडपठण करण्याची इच्छा असून त्या सोबतच आमच्या सद्गुरुंचे - परमपूज्य अनिरुद्धबापूंचे गुणसंकीर्तनही करायचे आहे. आमची सद्गुरु उपासना शनिवारीच व ६ ते ७ यावेळेत करणे अपेक्षित असल्यामुळे आम्ही काही केल्या आमची वेळ बदलू शकत नाही. तरी तुम्ही कृपया दुसरा वार देऊ शकलात तर मी आपली आभारी असेन.’ 

ठरल्याप्रमाणे मी संध्याकाळी आपली उपासना संपल्यावर द्वारकाधीश मंदिरात गेले व तेथे सुंदरकांडपठण करणार्‍या मंडळींसमोर माझी इच्छा व्यक्त केली.

....आणि काय आश्‍चर्य, अक्षरशः बापूंचीच लीला, त्या सहकार्‍यांनी मला दुसर्‍या वारासाठी होकार दिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तारीख ठरली रविवार दि. १९ ऑगस्ट २०१२. खरंच, अशक्य ते शक्य करविणारा माझा बापूच !!

हे कार्यक्रमाचे नक्की झाले, तर दुसरीच एक अडचण उभी राहिली. आमच्या भागात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे मला, मिस्टरांना, घरच्यांना तसेच सुंदरकांडपठण करणार्‍या मंडळप्रमुखांना प्रश्‍न पडला की १९ तारखेलाही पाऊस  असाच सुरू राहिला तर प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल. परंतु बापुकृपेने प्रोग्रामच्या दोन दिवस अगोदर पाऊस थांबला आणि जोमाने तयारीला सुरुवात झाली.

१९ तारखेला राहत्या घरी सकाळी पादुकारूपातील बापूंना घरी आणले. पादुकापूजन झाले. संध्याकाळी ठरलेल्या वेळेवर सुंदरकांडपठणाला सुरुवात झाली. ह्यावेळेस बापूभक्त व नातेवाईक उपस्थित होते. श्रीरामांच्या, हनुमंताच्या फोटो मागे - ‘तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीही नाही’ ही सद्गुरुंची ग्वाही असलेला बॅनर लावलेला होता. का कोण जाणे, पण त्या ग्वाहीकडे सुंदरकांड म्हणणार्‍या मंडळप्रमुखाचे सारखे लक्ष जात होते. नंतर बोलताना मध्ये मध्ये अनेक वेळा त्यांनी या वाक्याचा - ‘किती सुंदर आणि शक्ती देणारं वाक्य आहे नाही’ - असा मोठ्या कौतुकाने उल्लेख केला व अनेकदा बापूंचा जयजयकारही केला. ठरल्याप्रमाणे सुंदरकांड संपल्यावर डॉ. प्रकाशसिंह झेंडे यांनी उपस्थितांसमोर बापूंचं गुणसंकीर्तन केलं. बापूंविषयी कुतूहल अनेकांच्या चेहर्‍यावरून, बोलण्यावरून दिसूनही आलं.

माझ्या मनासारखा, नितांत आनंद देणारा कार्यक्रम झाला होता....नव्हे, माझ्या बापूंनी माझी इच्छा जाणून तो करवून घेतला होता.

बापूंचे कार्य तेच करवून घेणार, ह्या सत्याची खूण पुढे अजून एकदा पटली. या पादुकापूजन-सुंदरकांडपठण-गुणसंकीर्तन कार्यक्रमासाठी साधारणतः ५०० लोकांना आमंत्रित केल्यामुळे महाप्रसादासाठी व्यवस्थाही तेवढ्याच अनुमानाने करण्यात आली होती. पण सुंदरकांडपठण सुरू झालं आणि लोकांची संख्याही वाढतच गेली.

पठणानंतर गुणसंकीर्तन झाल्यावर महाप्रसादास (जेवणास) सुरुवात झाली. पण उपस्थित श्रद्धावानांची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसत असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला प्रश्न पडला की आता कसं करावं?

म्हटलं आता बापूच काय ते बघतील. मग बापूंचे नाम घेत माझ्या आईला महाप्रसादात (जेवणात) उदी टाकण्यास सांगितलं. बापूंची कृपाच न्यारी.... चक्क ५०० ऐवजी जवळपास १ हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला....!!!

....श्रीराम, बापू! हे सर्वकाही शक्य झालं ते फक्त बापू, आई व दादांमुळेच !

बापूराया, अशीच सदैव तुझी कृपा आम्हां सर्व भक्तांवर राहो व कायम आम्हाला तुझ्या चरणांजवळ बांधून ठेवो हीच तुझ्या चरणांशी प्रार्थना.


॥ हरि ॐ ॥
04:03 samirsinh dattopadhye
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

श्रद्धावानांच्या मनातील सर्व उचित, पवित्र इच्छा ते सद्गुरुतत्त्व पूर्ण करतंच, असा श्रद्धावानांचा अनुभव आहे. आणि एकदा एखाद्या श्रद्धावानाच्या मनातील एखादी उचित, पवित्र इच्छा पूर्ण व्हावी असा ‘संकल्प’ त्या ‘सत्यसंकल्प’ सद्गुरुंनी केला की मग ती इच्छा पूर्ण होण्याच्या आड येणार्‍या अनेक गोष्टी मग आश्‍चर्यकारकरित्या आपोआप बाजूला होतात.
- सेजलवीरा भट, नंदुरबार 



‘तू’ आणि ‘मी’ मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीही नाही....हे श्रद्धावानाला दिलेलं वचन बापू पाळतोच पाळतो. याची प्रचिती देणारा हा अनुभव बापू चरणी अर्पित करते.

परमपूज्य बापूंना ‘सुंदरकांड’ आवडतं. रामायणातील ह्या सर्वांत सुंदर भागाचे रसग्रहण श्रद्धावानांनाही करता यावे ह्याकरिता बापूंनी आपल्या ‘दैनिक प्रत्यक्ष’ मधून सुंदरकांडावर मराठीतून ‘तुलसीपत्र’ ही अग्रलेखमालिकाही मराठी व हिंदीतून चालू केली. म्हणून आपणही बापूंचे पादुकापूजन करून, त्यासमवेत सुंदरकांड पठणासहित बापूंचं गुणसंकीर्तन करावं अशी इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. याविषयी मी आमच्या इथल्या अनिरुद्ध उपासनाकेंद्रातील काही महिलाभक्तांनाही सांगितलं. त्यांनाही माझा हा विचार खूप आवडला. पण पुढे प्रश्न होता - हे सर्व होणार कसं आणि कधी ?

हा विचार करत अनेक दिवस गेले. अखेर श्रावण सुरू झाला आणि सोबत दरवर्षीप्रमाणे सर्व भक्तांकडे साखळी पादुकापूजन करण्यास सुरुवात झाली. मी मात्र हा सगळा कार्यक्रम एकदम करायचा असल्याने ह्या साखळी पादुकापूजनाकरिता नाव दिले नाही. पण आता माझ्या मनात असलेल्या इच्छेने आणखीनच जोर धरला होता. अर्थात मिस्टर कितपत राजी होतील, ही शंकादेखील होतीच. असो, जे काय होईल ते बापूंच्याच इच्छेने अशी मी मनाची समजूत काढली.

एक दिवस रात्री हे सर्व बापूंशी मनात बोलता बोलता झोपून गेले. सकाळी जाग आली ती कानावर पडलेल्या एका भजनाच्या आवाजाने. उठून खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक साधु ते भजन गात होता. हा दिवस होता शनिवारचा. त्या साधुपुरुषाने ते भजन माझ्या घराच्या परिसरात बर्‍याच वेळपर्यंत म्हटलं व नंतर तो कुठे गेला कळलंच नाही. त्या भजनाने एक उभारी आल्यासारखं वाटलं. मनात जी मिस्टरांना सुंदरकांड व पादुकापूजनाविषयी सांगण्याची भीती होती ती जवळपास नाहीशीच झाली. फेश झाल्यावर मनाशी ठाम निश्‍चय करून त्यांना मी माझी कल्पना सांगितली....आणि काय आश्चर्य! त्यांनी सुंदरकांड व पादुका पूजन करण्यास होकार दिला व सुंदरकांड म्हणणार्‍या एका भजनी मंडळाच्या प्रमुखांशी बोलून वार, तारीख व खर्चाविषयी विचारपूस करण्यासाठी सांगितले. तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही. बापूंचे मी मनातल्या मनात आभार मानले. हे सर्व बापूच घडवत आहेत व सकाळी भजन म्हणणारा साधू पुरुष दुसरा कोणी नसून माझे ‘बापूच’ होते असा विश्‍वास मला वाटू लागला.

खरंच बापूराया, तू प्रत्येक भक्ताच्या मनातलं जाणतोसच जाणतोस!

मी ओळखीच्या एका व्यक्तीला सुंदरकांडाचे गायन करणार्‍या मंडळाची व त्यांच्या प्रमुखांची माहिती काढण्यास सांगितले. अशा एका मंडळाविषयी माहिती व त्यांच्या प्रमुखांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळताच मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले, ‘‘आम्ही सुंदरकांड फक्त शनिवारी करतो व तेदेखील सायंकाळी ६.३० ते १०.०० ह्या वेळात.’’ शनिवारी सायंकाळी? आपल्या उपासनेच्या वेळेत? कसं शक्य होणार?

मग मी त्यांना आपल्या शनिवारच्या अनिरुद्ध उपासनेबद्दल सांगून, दुसरी वेळ देण्यास सांगितली. पण आपण शनिवारखेरीज अन्य दिवशी कार्यक्रम करत नसल्याचे सांगून, उलट आम्हालाच उपासनेचा दिवस बदलण्याविषयी त्यांनी सांगितले. ते अर्थातच शक्य नव्हते. काय करावे काही सुचत नव्हते. कार्यक्रम सोडून द्यावा लागणार की काय ह्या कल्पनेने मला खूपच टेन्शन आले. मग मनातून बापूंनाच हाक मारली. मनात बापूंचं नाव घेत मी त्यांना समजावून सांगितलं, ‘‘आम्ही शनिवारची उपासना चेंज नाही करू शकत. ते आमच्या हातात नाही. शनिवारची उपासना ही आमच्या सद्गुरु अनिरुद्ध बापूंकडूनच ठरलेली आहे.’’ असं सांगत त्यांना थोडक्यात बापूंची माहितीही सांगितली.

बापूंनी त्यांचे कार्य सुरू केले होते. ह्या माझ्या वक्तव्यानंतर त्या सत्संग प्रमुखांच्या मनात थोडी चलबिचल झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले. त्यांना बापूंविषयी थोडीबहुत माहिती होती व आपल्या बापुपरिवाराबद्दल त्यांचे मतही चांगले होते.

त्यामुळे पुढे ते म्हणाले, ‘‘आज शनिवार आहे. द्वारकाधीश मंदिरात सुंदरकांडपठणाचा कार्यक्रम आहे. तुम्ही तेथे या. माझ्यासोबत जे इतर सहकारी आहेत, त्यांना विचारून सांगतो. तुम्ही त्यांना सर्व समजावून सांगा की ‘माझी तुमच्याकडून सुंदरकांडपठण करण्याची इच्छा असून त्या सोबतच आमच्या सद्गुरुंचे - परमपूज्य अनिरुद्धबापूंचे गुणसंकीर्तनही करायचे आहे. आमची सद्गुरु उपासना शनिवारीच व ६ ते ७ यावेळेत करणे अपेक्षित असल्यामुळे आम्ही काही केल्या आमची वेळ बदलू शकत नाही. तरी तुम्ही कृपया दुसरा वार देऊ शकलात तर मी आपली आभारी असेन.’ 

ठरल्याप्रमाणे मी संध्याकाळी आपली उपासना संपल्यावर द्वारकाधीश मंदिरात गेले व तेथे सुंदरकांडपठण करणार्‍या मंडळींसमोर माझी इच्छा व्यक्त केली.

....आणि काय आश्‍चर्य, अक्षरशः बापूंचीच लीला, त्या सहकार्‍यांनी मला दुसर्‍या वारासाठी होकार दिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तारीख ठरली रविवार दि. १९ ऑगस्ट २०१२. खरंच, अशक्य ते शक्य करविणारा माझा बापूच !!

हे कार्यक्रमाचे नक्की झाले, तर दुसरीच एक अडचण उभी राहिली. आमच्या भागात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे मला, मिस्टरांना, घरच्यांना तसेच सुंदरकांडपठण करणार्‍या मंडळप्रमुखांना प्रश्‍न पडला की १९ तारखेलाही पाऊस  असाच सुरू राहिला तर प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल. परंतु बापुकृपेने प्रोग्रामच्या दोन दिवस अगोदर पाऊस थांबला आणि जोमाने तयारीला सुरुवात झाली.

१९ तारखेला राहत्या घरी सकाळी पादुकारूपातील बापूंना घरी आणले. पादुकापूजन झाले. संध्याकाळी ठरलेल्या वेळेवर सुंदरकांडपठणाला सुरुवात झाली. ह्यावेळेस बापूभक्त व नातेवाईक उपस्थित होते. श्रीरामांच्या, हनुमंताच्या फोटो मागे - ‘तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीही नाही’ ही सद्गुरुंची ग्वाही असलेला बॅनर लावलेला होता. का कोण जाणे, पण त्या ग्वाहीकडे सुंदरकांड म्हणणार्‍या मंडळप्रमुखाचे सारखे लक्ष जात होते. नंतर बोलताना मध्ये मध्ये अनेक वेळा त्यांनी या वाक्याचा - ‘किती सुंदर आणि शक्ती देणारं वाक्य आहे नाही’ - असा मोठ्या कौतुकाने उल्लेख केला व अनेकदा बापूंचा जयजयकारही केला. ठरल्याप्रमाणे सुंदरकांड संपल्यावर डॉ. प्रकाशसिंह झेंडे यांनी उपस्थितांसमोर बापूंचं गुणसंकीर्तन केलं. बापूंविषयी कुतूहल अनेकांच्या चेहर्‍यावरून, बोलण्यावरून दिसूनही आलं.

माझ्या मनासारखा, नितांत आनंद देणारा कार्यक्रम झाला होता....नव्हे, माझ्या बापूंनी माझी इच्छा जाणून तो करवून घेतला होता.

बापूंचे कार्य तेच करवून घेणार, ह्या सत्याची खूण पुढे अजून एकदा पटली. या पादुकापूजन-सुंदरकांडपठण-गुणसंकीर्तन कार्यक्रमासाठी साधारणतः ५०० लोकांना आमंत्रित केल्यामुळे महाप्रसादासाठी व्यवस्थाही तेवढ्याच अनुमानाने करण्यात आली होती. पण सुंदरकांडपठण सुरू झालं आणि लोकांची संख्याही वाढतच गेली.

पठणानंतर गुणसंकीर्तन झाल्यावर महाप्रसादास (जेवणास) सुरुवात झाली. पण उपस्थित श्रद्धावानांची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसत असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला प्रश्न पडला की आता कसं करावं?

म्हटलं आता बापूच काय ते बघतील. मग बापूंचे नाम घेत माझ्या आईला महाप्रसादात (जेवणात) उदी टाकण्यास सांगितलं. बापूंची कृपाच न्यारी.... चक्क ५०० ऐवजी जवळपास १ हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला....!!!

....श्रीराम, बापू! हे सर्वकाही शक्य झालं ते फक्त बापू, आई व दादांमुळेच !

बापूराया, अशीच सदैव तुझी कृपा आम्हां सर्व भक्तांवर राहो व कायम आम्हाला तुझ्या चरणांजवळ बांधून ठेवो हीच तुझ्या चरणांशी प्रार्थना.


॥ हरि ॐ ॥

Wednesday 6 September 2017

Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

संकट हे कोणालाच चुकले नाही. प्रारब्धानुसार ज्याला त्याला आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना हा करावाच लागतो. फरक कुठे होतो, तर जो सद्गुरुंच्या छत्रछायेखाली आहे, त्याला कुठून ना कुठून संरक्षण मिळते, संकटात अचानक कुठूनतरी मदत उभी राहते, मनाधार मिळतो, हा बहुतेक सद्गुरुभक्तांचा अनुभव आहे.
 - जीजाबराव सोनवणे, जिराळी (जळगाव)

मी २००४ मध्ये अनिरुद्धबापूंच्या सेवाकार्यात प्रथम भाग घेतला. त्यानंतर मला सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अनेक अनुभव आले.
मला पहिला अनुभव २००८ मध्ये आला. माझी पत्नी, चार मुली व मोठा मुलगा असा माझा परिवार आहे व बापूंच्या कृपेने सुखात चालत होता. माझी दोन नंबरची मुलगी गरोदर होती. तिची प्रसूतीची तारीख दिली होती, ३० जुलै २००८. म्हणून मी माझ्या मुलीस भेटावयास २६ जुलैला जळगावमधील मु.पो. मोहाडी येथे गेलो.

योगायोगाने ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी, म्हणजे शनिवारी मुलीचे पोट दुखावयास सुरुवात झाली. त्यावेळी माझ्या मुलाने गावातील नर्सला बोलावले. तिने खूप प्रयत्न केले परंतु यश येत नव्हते. तेव्हा त्या नर्सने सांगितले की तुम्ही कुठेतरी दवाखान्यात घेऊन जा.

घरातील मंडळी घाबरली. आता बापूंशिवाय कोण आधार? म्हणून लगेच बापूंचे नामस्मरण सुरू केले. आमच्याजवळ असलेली संस्थेची उदी तिला पाण्यात टाकून पाजली व थोडी कपाळास लावली व बापूंना सांगितले की ‘बापू, तुम्हीच तुमच्या नातवाला सांभाळा!’

तोच काय चमत्कार! तेवढ्यात माझ्या मुलीला - स्वतः बापूच आमच्या घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभे राहिले आहेत असे दृश्य दिसले. मुलगी ओरडलीच, ‘‘अगं आई, बघ बापू आले’’ आणि असे म्हणत तिने बापूंचा जयजयकारही केला - ‘जय बापूराया, जय बापूराया’!

इतके होतेय तोच बापूंनी उजवा हात वर करून आशीर्वाद दिला असे तिला दिसले; आणि अक्षरशः त्यानंतर लगेचच मुलीची डिलिव्हरी झाली सुद्धा....तिला मुलगा झाला! अनुभवी नर्सलाही जी डिलिव्हरी गुंतागुंतीची (‘कॉम्प्लिकेटेड’) वाटत होती, ती माझ्या बापूंच्या कृपेने किती सुलभरित्या झाली! खरंच बापूराया, आमच्यासारख्या सर्वसामान्य भक्ताने मारलेल्या हाकेलाही धावून आलास....मी तुझे कसे ऋण फेडू?

दुसरा अनुभव असा की आम्ही जिराळी व इंधवे केंद्र मिळून १४ माणसे एकत्र खाजगी गाडी करून गुरुवार दि. १७ डिसेंबर २००९ रोजी ठीक ६ वाजता बापूंच्या प्रवचनासाठी बांद्रा न्यू इंग्लिश स्कूल येथे गेलो. त्या वेळेस बापू गुरुक्षेत्रम्मध्ये स्वतःच्या हाताने उदी देत असत. त्याकरिताही दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी आमचा नंबर लागला होता. शिवाय गुरुवारी प्रवचनस्थळी आम्हाला पुष्पवृष्टीची सेवा मिळाली होती म्हणून आम्हां सर्वांना फारच आनंद झाला होता. पण नेमके त्या दिवशी बापू काही प्रवचनास आले नाहीत. माझ्याबरोबर आलेल्यांतील काही लोकांचा धीर सुटून ते त्यावरून बापूंवर शंका घेऊन तक्रारीच्या सुरात काहीबाही बोलू लागले. त्यांचे म्हणणे होते की ‘तुम्ही म्हणता बापूंना सगळं कळतं, मग आपण एवढे लांबून एवढा खर्च करून आलो आणि बापूंनी दर्शन का नाही दिलं ?’, वगैरे वगैरे.

त्यानंतर आम्ही सद्गुरु गुणसंकीर्तनसत्संग ऐकत त्या स्कूलच्या पटांगणात बसलो असता रात्री ९ वाजता एकाच्या मोबाईलवर घरुन फोन आला की आपल्या गावामध्ये गारांचा पाऊस पडला....एवढा की संपूर्ण गावभर गारांचा दोन फुटाचा थर जमिनीवर लागला आहे. माझ्या घरूनसुद्धा फोन आला. प्रश्न होता आम्हा सर्वांच्या शेतजमिनीचा. पीकांची सर्व नासाडी झाली असणार ह्या विचाराने कोणाचेच मन त्यापुढील सत्संगात लागत नव्हते. मनात बापूंची आळवणी सुरूच होती की बापुराया, हे असे कसे झाले?

दुसर्‍या दिवशी आम्हाला गुरुक्षेत्रम् येथे बापूंच्या हस्ते उदीचा प्रसाद मिळणार होता. म्हणून आम्ही कुर्ल्याला, इंधपे येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक श्री. महेंद्र निंबा पाटील यांच्या बहिणीचे घर आहे, त्यांच्या घरी मुक्कामाला राहणार होतो. त्यामुळे वांद्रे येथून आम्ही कुर्ल्याला त्यांच्या घरी गेलो. बाकीची मंडळी ‘लगेच गावाला जायला निघूया’ म्हणून सांगत होती, पण ‘नशिबाने उदीप्रसादासाठी नंबर लागलाय, तो गमावू नका’ असे म्हणून कुर्ल्याच्या पाहुण्यांनी कोणासही घरी निघू दिले नाही व आमचा चांगला पाहुणचार केला.

ती रात्र तशीच गावच्या संकटाचा विचार करण्यात गेली. सकाळी उदी प्रसादाचा लाभ होता परंतु ह्या गारांच्या पावसाने आमच्या शेतांचे किती नुकसान झाले असेल ह्या विचाराने आमचे कोणाचेच चित्त लागत नव्हते.

शेवटी बापूलाच दया आली बहुतेक....सकाळी ७ वाजता माझ्या घरून मुलाचा फोन आला की आपल्या शेताचं विशेष नुकसान झालेलं नाही, आपल्या शेतात गारांचा पाऊस फारच कमी होता. माझा जीव भांड्यात पडला व मी उलटसुलट विचार करून सद्गुरुंना त्रास दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली.

आश्‍चर्य म्हणजे हे इतक्यावरच थांबले नाही, तर आम्ही जेवढे चौदाजण तिथे आलो होतो, त्यांतल्या प्रत्येकाच्याच घरून आता फोन येऊ लागले की आपलं शेत सुखरूप आहे....आपल्या शेतात गारांचा पाऊस नव्हता किंवा फारच कमी पडला! आता बोला!

असा हा माझा सद्गुरुराया....आपल्या भक्ताला तारणारे....माझे बापू!

सकाळी अचानक मिळालेल्या ह्या कलाटणीने आता सर्वांचीच मने हलकी झाली होती. त्यामुळे आम्ही हॅप्पी होम श्रीगुरुक्षेत्रम्ला उदी प्रसादाचाही आनंद घेऊ शकलो. बापू हे असेच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी छायाछत्र धरून बसलेले असतात. म्हणूनच आमच्यावरचे भयानक संकट बापूरायांनी टाळले.

बापू, तुझे ऋण कसे फेडू? आमच्याकडून चांगली सेवाभक्ती करून घे हीच प्रार्थना!


॥ हरि ॐ ॥
01:26 samirsinh dattopadhye
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

संकट हे कोणालाच चुकले नाही. प्रारब्धानुसार ज्याला त्याला आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना हा करावाच लागतो. फरक कुठे होतो, तर जो सद्गुरुंच्या छत्रछायेखाली आहे, त्याला कुठून ना कुठून संरक्षण मिळते, संकटात अचानक कुठूनतरी मदत उभी राहते, मनाधार मिळतो, हा बहुतेक सद्गुरुभक्तांचा अनुभव आहे.
 - जीजाबराव सोनवणे, जिराळी (जळगाव)

मी २००४ मध्ये अनिरुद्धबापूंच्या सेवाकार्यात प्रथम भाग घेतला. त्यानंतर मला सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अनेक अनुभव आले.
मला पहिला अनुभव २००८ मध्ये आला. माझी पत्नी, चार मुली व मोठा मुलगा असा माझा परिवार आहे व बापूंच्या कृपेने सुखात चालत होता. माझी दोन नंबरची मुलगी गरोदर होती. तिची प्रसूतीची तारीख दिली होती, ३० जुलै २००८. म्हणून मी माझ्या मुलीस भेटावयास २६ जुलैला जळगावमधील मु.पो. मोहाडी येथे गेलो.

योगायोगाने ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी, म्हणजे शनिवारी मुलीचे पोट दुखावयास सुरुवात झाली. त्यावेळी माझ्या मुलाने गावातील नर्सला बोलावले. तिने खूप प्रयत्न केले परंतु यश येत नव्हते. तेव्हा त्या नर्सने सांगितले की तुम्ही कुठेतरी दवाखान्यात घेऊन जा.

घरातील मंडळी घाबरली. आता बापूंशिवाय कोण आधार? म्हणून लगेच बापूंचे नामस्मरण सुरू केले. आमच्याजवळ असलेली संस्थेची उदी तिला पाण्यात टाकून पाजली व थोडी कपाळास लावली व बापूंना सांगितले की ‘बापू, तुम्हीच तुमच्या नातवाला सांभाळा!’

तोच काय चमत्कार! तेवढ्यात माझ्या मुलीला - स्वतः बापूच आमच्या घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभे राहिले आहेत असे दृश्य दिसले. मुलगी ओरडलीच, ‘‘अगं आई, बघ बापू आले’’ आणि असे म्हणत तिने बापूंचा जयजयकारही केला - ‘जय बापूराया, जय बापूराया’!

इतके होतेय तोच बापूंनी उजवा हात वर करून आशीर्वाद दिला असे तिला दिसले; आणि अक्षरशः त्यानंतर लगेचच मुलीची डिलिव्हरी झाली सुद्धा....तिला मुलगा झाला! अनुभवी नर्सलाही जी डिलिव्हरी गुंतागुंतीची (‘कॉम्प्लिकेटेड’) वाटत होती, ती माझ्या बापूंच्या कृपेने किती सुलभरित्या झाली! खरंच बापूराया, आमच्यासारख्या सर्वसामान्य भक्ताने मारलेल्या हाकेलाही धावून आलास....मी तुझे कसे ऋण फेडू?

दुसरा अनुभव असा की आम्ही जिराळी व इंधवे केंद्र मिळून १४ माणसे एकत्र खाजगी गाडी करून गुरुवार दि. १७ डिसेंबर २००९ रोजी ठीक ६ वाजता बापूंच्या प्रवचनासाठी बांद्रा न्यू इंग्लिश स्कूल येथे गेलो. त्या वेळेस बापू गुरुक्षेत्रम्मध्ये स्वतःच्या हाताने उदी देत असत. त्याकरिताही दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी आमचा नंबर लागला होता. शिवाय गुरुवारी प्रवचनस्थळी आम्हाला पुष्पवृष्टीची सेवा मिळाली होती म्हणून आम्हां सर्वांना फारच आनंद झाला होता. पण नेमके त्या दिवशी बापू काही प्रवचनास आले नाहीत. माझ्याबरोबर आलेल्यांतील काही लोकांचा धीर सुटून ते त्यावरून बापूंवर शंका घेऊन तक्रारीच्या सुरात काहीबाही बोलू लागले. त्यांचे म्हणणे होते की ‘तुम्ही म्हणता बापूंना सगळं कळतं, मग आपण एवढे लांबून एवढा खर्च करून आलो आणि बापूंनी दर्शन का नाही दिलं ?’, वगैरे वगैरे.

त्यानंतर आम्ही सद्गुरु गुणसंकीर्तनसत्संग ऐकत त्या स्कूलच्या पटांगणात बसलो असता रात्री ९ वाजता एकाच्या मोबाईलवर घरुन फोन आला की आपल्या गावामध्ये गारांचा पाऊस पडला....एवढा की संपूर्ण गावभर गारांचा दोन फुटाचा थर जमिनीवर लागला आहे. माझ्या घरूनसुद्धा फोन आला. प्रश्न होता आम्हा सर्वांच्या शेतजमिनीचा. पीकांची सर्व नासाडी झाली असणार ह्या विचाराने कोणाचेच मन त्यापुढील सत्संगात लागत नव्हते. मनात बापूंची आळवणी सुरूच होती की बापुराया, हे असे कसे झाले?

दुसर्‍या दिवशी आम्हाला गुरुक्षेत्रम् येथे बापूंच्या हस्ते उदीचा प्रसाद मिळणार होता. म्हणून आम्ही कुर्ल्याला, इंधपे येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक श्री. महेंद्र निंबा पाटील यांच्या बहिणीचे घर आहे, त्यांच्या घरी मुक्कामाला राहणार होतो. त्यामुळे वांद्रे येथून आम्ही कुर्ल्याला त्यांच्या घरी गेलो. बाकीची मंडळी ‘लगेच गावाला जायला निघूया’ म्हणून सांगत होती, पण ‘नशिबाने उदीप्रसादासाठी नंबर लागलाय, तो गमावू नका’ असे म्हणून कुर्ल्याच्या पाहुण्यांनी कोणासही घरी निघू दिले नाही व आमचा चांगला पाहुणचार केला.

ती रात्र तशीच गावच्या संकटाचा विचार करण्यात गेली. सकाळी उदी प्रसादाचा लाभ होता परंतु ह्या गारांच्या पावसाने आमच्या शेतांचे किती नुकसान झाले असेल ह्या विचाराने आमचे कोणाचेच चित्त लागत नव्हते.

शेवटी बापूलाच दया आली बहुतेक....सकाळी ७ वाजता माझ्या घरून मुलाचा फोन आला की आपल्या शेताचं विशेष नुकसान झालेलं नाही, आपल्या शेतात गारांचा पाऊस फारच कमी होता. माझा जीव भांड्यात पडला व मी उलटसुलट विचार करून सद्गुरुंना त्रास दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली.

आश्‍चर्य म्हणजे हे इतक्यावरच थांबले नाही, तर आम्ही जेवढे चौदाजण तिथे आलो होतो, त्यांतल्या प्रत्येकाच्याच घरून आता फोन येऊ लागले की आपलं शेत सुखरूप आहे....आपल्या शेतात गारांचा पाऊस नव्हता किंवा फारच कमी पडला! आता बोला!

असा हा माझा सद्गुरुराया....आपल्या भक्ताला तारणारे....माझे बापू!

सकाळी अचानक मिळालेल्या ह्या कलाटणीने आता सर्वांचीच मने हलकी झाली होती. त्यामुळे आम्ही हॅप्पी होम श्रीगुरुक्षेत्रम्ला उदी प्रसादाचाही आनंद घेऊ शकलो. बापू हे असेच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी छायाछत्र धरून बसलेले असतात. म्हणूनच आमच्यावरचे भयानक संकट बापूरायांनी टाळले.

बापू, तुझे ऋण कसे फेडू? आमच्याकडून चांगली सेवाभक्ती करून घे हीच प्रार्थना!


॥ हरि ॐ ॥

Monday 4 September 2017



 जेव्हा आपण - ‘माझ्या आयुष्यात जे काही होणार, ते सद्गुरुराया, तुझ्याच इच्छेने’ अशी मनोभूमिका ठेवतो, तेव्हा तो आपल्याला भरभरून देतो’, हा बापुभक्तांना नित्य येणारा अनुभव आहे. हा अनुभव कथन केलेली श्रद्धावान स्त्री प्रथम बापूभक्त नव्हती. तिला बापूभक्तीत असणारे सासर मिळाले. सासरच्यांचे पुरोगामी विचार बघून हळूहळू तिचीही बापूंवर श्रद्धा बसत गेली. पुढे तिच्या आयुष्यात जेव्हा एक वादळ आले, तेव्हा तिच्या सासरचे लोक - ‘जे काय होईल ती बापूंची इच्छा’ असे म्हणून तिला आधार देण्यास तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
अशा श्रद्धावानांना बापू टाकेलच कसा?
 - प्राजक्ता कुळकर्णी, भुसावळ
माझ्या आयुष्यातला बापूंचा हा सुंदर अनुभव. डिसेंबर २००९ मध्ये माझे लग्न झाले. सासर भुसावळ येथे असून सासरचे सर्वजण बापूभक्त आहेत. माझे मिस्टर औरंगाबाद येथे जॉब करत असल्यामुळे आम्ही दोघेच औरंगाबाद येथे रहात होतो. मला लग्नापूर्वी बापूंबद्दल काही माहिती नव्हती.

लग्न होऊन काही महिन्यांतच मला दिवस गेले. डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो. मात्र चेकअपचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ‘‘पोटात गाठ असल्यामुळे अ‍ॅबॉर्शन करावं लागणार.’’ हे ऐकून आमचे धाबे दणाणले. घरातील मोठी सून असल्यामुळे पहिलंच बाळ घरात येणार या आनंदात घरचे सगळे होते, पण हे ऐकून त्या आनंदावर विरजण पडणार होते. आता सासरी काय व कसे सांगणार आणि ते हा धक्का कसा सहन करतील ह्या विचारात मी पडले.

डॉक्टरांच्या मते आमच्याकडे विचार करण्यास २-३ आठवड्यांचा कालावधी होता. त्यादरम्यानच दिवाळी असल्यामुळे दिवाळी झाल्यावर अ‍ॅबॉर्शन करण्याचे ठरवून आम्ही दिवाळीकरिता भुसावळला आलो व मन घट्ट करून घडलेला सर्व प्रसंग सासू सासर्‍यांना सांगितला व आता काय प्रतिक्रिया येईल त्याची वाट बघत बसलो. पण सुदैवाने माझ्या सासरची माणसे कट्टर बापूभक्त आहेत आणि ‘श्रद्धावानांच्या जीवनात जे काही होते ते सद्गुरुंच्या इच्छेने’ ह्या मतावर ठाम असतात. त्यामुळे बापूंनीच हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांना दिली. त्यामुळे हे ऐकल्यावर घरच्या सार्‍यांना दुःख जरी झाले असले तरी कुठलीही आक्रस्ताळी प्रतिक्रिया उमटली नाही. सासरे फक्त - ‘आता जे होणार ती बापूंची इच्छा’ एवढेच म्हणाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे दीर मुकेशसिंह कुळकर्णी यांनी आमच्या घरी परमपूज्य बापूंचे पादुकापूजन आयोजित करवून, ते आम्हां दोघांकडून करून घेतले. तेदेखील हेच म्हणाले की ‘बापू जे योग्य ते नक्की करतील. ते आहेतच आपल्यासोबत!’ ह्या अशा प्रतिक्रियेमुळे, मनाला दुःख जरी झाले असले तरी टेन्शन दूर झाले होते.

दिवाळीनंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो व त्यांच्याशी ऑपरेशन संदर्भात चर्चा केली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा चेकअप केले. रिपोर्ट आला.

तो वाचून डॉक्टरांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! ते पुन्हा पुन्हा रिपोर्ट वाचत होते. त्यांनी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी माझ्या मिस्टरांना विचारले, ‘‘तुम्ही मधल्या काळात काही ट्रीटमेंट अथवा ऑपरेशन केलेत का? कारण आधीच्या रिपोर्टमध्ये दिसत असलेली गाठ आता नाहीशी झाली आहे आणि पोटातला गर्भसुद्धा व्यवस्थित आहे. त्यामुळे आता तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता. अ‍ॅबॉर्शनची काहीच आवश्यकता नाही!’’

हे ऐकून आम्हा दोघांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ‘मी तुला कधीच टाकणार नाही’ ही बापूंनी सर्व श्रद्धावानांना दिलेली ग्वाही माझ्या बाबतीत खरी करून दाखवली होती.

खरंच, मातृत्वाचे सुख मी बापूंच्या कृपेने अनुभवू शकले.

यथावकाश डिलिव्हरी होऊन मला मुलगा झाला.

आता माझा मुलगा ‘श्‍लोक’ २ वर्षाचा झाला आहे व पूर्णपणे निरोगी आहे. आमच्यासमोर हा बापूंच्या कृपेचा अनमोल ठेवाच आहे. खरंच,

एक विश्‍वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा

ही खूणगाठ मनाशी बांधली की तो सद्गुरु मग आपल्याला सगळ्यातूनच तारून नेतो.
आम्हां सर्वांकडून बापूंची भक्ती आणि सेवा अखंड घडो, हीच बापुचरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

04:03 samirsinh dattopadhye


 जेव्हा आपण - ‘माझ्या आयुष्यात जे काही होणार, ते सद्गुरुराया, तुझ्याच इच्छेने’ अशी मनोभूमिका ठेवतो, तेव्हा तो आपल्याला भरभरून देतो’, हा बापुभक्तांना नित्य येणारा अनुभव आहे. हा अनुभव कथन केलेली श्रद्धावान स्त्री प्रथम बापूभक्त नव्हती. तिला बापूभक्तीत असणारे सासर मिळाले. सासरच्यांचे पुरोगामी विचार बघून हळूहळू तिचीही बापूंवर श्रद्धा बसत गेली. पुढे तिच्या आयुष्यात जेव्हा एक वादळ आले, तेव्हा तिच्या सासरचे लोक - ‘जे काय होईल ती बापूंची इच्छा’ असे म्हणून तिला आधार देण्यास तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
अशा श्रद्धावानांना बापू टाकेलच कसा?
 - प्राजक्ता कुळकर्णी, भुसावळ
माझ्या आयुष्यातला बापूंचा हा सुंदर अनुभव. डिसेंबर २००९ मध्ये माझे लग्न झाले. सासर भुसावळ येथे असून सासरचे सर्वजण बापूभक्त आहेत. माझे मिस्टर औरंगाबाद येथे जॉब करत असल्यामुळे आम्ही दोघेच औरंगाबाद येथे रहात होतो. मला लग्नापूर्वी बापूंबद्दल काही माहिती नव्हती.

लग्न होऊन काही महिन्यांतच मला दिवस गेले. डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो. मात्र चेकअपचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ‘‘पोटात गाठ असल्यामुळे अ‍ॅबॉर्शन करावं लागणार.’’ हे ऐकून आमचे धाबे दणाणले. घरातील मोठी सून असल्यामुळे पहिलंच बाळ घरात येणार या आनंदात घरचे सगळे होते, पण हे ऐकून त्या आनंदावर विरजण पडणार होते. आता सासरी काय व कसे सांगणार आणि ते हा धक्का कसा सहन करतील ह्या विचारात मी पडले.

डॉक्टरांच्या मते आमच्याकडे विचार करण्यास २-३ आठवड्यांचा कालावधी होता. त्यादरम्यानच दिवाळी असल्यामुळे दिवाळी झाल्यावर अ‍ॅबॉर्शन करण्याचे ठरवून आम्ही दिवाळीकरिता भुसावळला आलो व मन घट्ट करून घडलेला सर्व प्रसंग सासू सासर्‍यांना सांगितला व आता काय प्रतिक्रिया येईल त्याची वाट बघत बसलो. पण सुदैवाने माझ्या सासरची माणसे कट्टर बापूभक्त आहेत आणि ‘श्रद्धावानांच्या जीवनात जे काही होते ते सद्गुरुंच्या इच्छेने’ ह्या मतावर ठाम असतात. त्यामुळे बापूंनीच हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांना दिली. त्यामुळे हे ऐकल्यावर घरच्या सार्‍यांना दुःख जरी झाले असले तरी कुठलीही आक्रस्ताळी प्रतिक्रिया उमटली नाही. सासरे फक्त - ‘आता जे होणार ती बापूंची इच्छा’ एवढेच म्हणाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे दीर मुकेशसिंह कुळकर्णी यांनी आमच्या घरी परमपूज्य बापूंचे पादुकापूजन आयोजित करवून, ते आम्हां दोघांकडून करून घेतले. तेदेखील हेच म्हणाले की ‘बापू जे योग्य ते नक्की करतील. ते आहेतच आपल्यासोबत!’ ह्या अशा प्रतिक्रियेमुळे, मनाला दुःख जरी झाले असले तरी टेन्शन दूर झाले होते.

दिवाळीनंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो व त्यांच्याशी ऑपरेशन संदर्भात चर्चा केली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा चेकअप केले. रिपोर्ट आला.

तो वाचून डॉक्टरांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! ते पुन्हा पुन्हा रिपोर्ट वाचत होते. त्यांनी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी माझ्या मिस्टरांना विचारले, ‘‘तुम्ही मधल्या काळात काही ट्रीटमेंट अथवा ऑपरेशन केलेत का? कारण आधीच्या रिपोर्टमध्ये दिसत असलेली गाठ आता नाहीशी झाली आहे आणि पोटातला गर्भसुद्धा व्यवस्थित आहे. त्यामुळे आता तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता. अ‍ॅबॉर्शनची काहीच आवश्यकता नाही!’’

हे ऐकून आम्हा दोघांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ‘मी तुला कधीच टाकणार नाही’ ही बापूंनी सर्व श्रद्धावानांना दिलेली ग्वाही माझ्या बाबतीत खरी करून दाखवली होती.

खरंच, मातृत्वाचे सुख मी बापूंच्या कृपेने अनुभवू शकले.

यथावकाश डिलिव्हरी होऊन मला मुलगा झाला.

आता माझा मुलगा ‘श्‍लोक’ २ वर्षाचा झाला आहे व पूर्णपणे निरोगी आहे. आमच्यासमोर हा बापूंच्या कृपेचा अनमोल ठेवाच आहे. खरंच,

एक विश्‍वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा

ही खूणगाठ मनाशी बांधली की तो सद्गुरु मग आपल्याला सगळ्यातूनच तारून नेतो.
आम्हां सर्वांकडून बापूंची भक्ती आणि सेवा अखंड घडो, हीच बापुचरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

Saturday 2 September 2017

Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥
05:02 samirsinh dattopadhye
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥

Friday 1 September 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥
03:49 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥

Thursday 31 August 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥
02:36 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥

Monday 28 August 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥
01:28 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥

Thursday 24 August 2017

Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥
02:18 samirsinh dattopadhye
Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥