Monday 9 March 2015
Shraddhavans line at event venue |
Sadguru Shree Aniruddha Bapu at Dhule |
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu |
large number of
|
|
Aniruddha Bapu at Dhule |
Bapu at Dhule |
Bapu at Dhule |
Bapu giving blessings to shraddhavan at dhule |
Top view of venue |
00:45
samirsinh dattopadhye
Shraddhavans line at event venue |
Sadguru Shree Aniruddha Bapu at Dhule |
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu |
large number of
|
|
Aniruddha Bapu at Dhule |
Bapu at Dhule |
Bapu at Dhule |
Bapu giving blessings to shraddhavan at dhule |
Top view of venue |
रविवारी दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी
एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात अनिरुद्ध बापू बोलत
होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत,साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे
तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा
मंत्रही दिला.
■ बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना अनिरुद्ध अॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हीने परेड करत बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.
■ मैदानात आकाशकंदील लावण्यात आले
होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या.
· बापूंच्या प्रवचनातील काही ठळक मुद्दे:
आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग
हे कसे करायचे? मग हे कसे होईल? यातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून
ज्याला उत्तर मिळते तो सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न
जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.
■ आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो काय? आणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
■ प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्वास वाढला
असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्यांचा मात्र आत्मविश्वास वाढतो.
■ जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्याचा ढोल वाजतच
राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..
■ आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना
होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे.
■ जे परमेश्वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.
■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे
अस्तित्व पुरेसे नाही.
■ जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिकानामस्मरण
करा.
मनात
भीती ठेवून भक्ती करू नका, मनातील
भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा
नव्हे.. भक्ती करणार्यांमध्येच ताकद असते. देवावर विश्वास असेल तर तुमचाही
आत्मविश्वास वाढेल..
आपल्यावर
कितीही संकटे आली तरी देव संकटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हाच परमेश्वरावरील
विश्वास होय. तोच आत्मविश्वास होय. तुमचा देवावर विश्वास पाहिजे. तरच तुमचा आत्मविश्वास
वाढेल. जसा आत्मविश्वासवाढेल तसे तुम्हाला फळ मिळेल. स्वत:ला कमी लेखू नका. जीवनात
संकटे येत राहतील.
Sadguru Shree Aniruddha Bapu |
- आत्मविश्वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर परमेश्वरावरील विश्वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्वास होय.
- जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजेनाम.
परमेश्वराच्या
नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक
गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवूनआणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही
त्यांनी प्रवचनातून सांगितले.
प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल
भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले की, जीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा
बाळगू नका..
भगवंताला
विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्वास
असावा पुरता ..”
00:26
samirsinh dattopadhye
रविवारी दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी
एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात अनिरुद्ध बापू बोलत
होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत,साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे
तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा
मंत्रही दिला.
■ बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना अनिरुद्ध अॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हीने परेड करत बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.
■ मैदानात आकाशकंदील लावण्यात आले
होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या.
· बापूंच्या प्रवचनातील काही ठळक मुद्दे:
आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग
हे कसे करायचे? मग हे कसे होईल? यातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून
ज्याला उत्तर मिळते तो सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न
जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.
■ आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो काय? आणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
■ प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्वास वाढला
असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्यांचा मात्र आत्मविश्वास वाढतो.
■ जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्याचा ढोल वाजतच
राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..
■ आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना
होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे.
■ जे परमेश्वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.
■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे
अस्तित्व पुरेसे नाही.
■ जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिकानामस्मरण
करा.
मनात
भीती ठेवून भक्ती करू नका, मनातील
भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा
नव्हे.. भक्ती करणार्यांमध्येच ताकद असते. देवावर विश्वास असेल तर तुमचाही
आत्मविश्वास वाढेल..
आपल्यावर
कितीही संकटे आली तरी देव संकटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हाच परमेश्वरावरील
विश्वास होय. तोच आत्मविश्वास होय. तुमचा देवावर विश्वास पाहिजे. तरच तुमचा आत्मविश्वास
वाढेल. जसा आत्मविश्वासवाढेल तसे तुम्हाला फळ मिळेल. स्वत:ला कमी लेखू नका. जीवनात
संकटे येत राहतील.
Sadguru Shree Aniruddha Bapu |
- आत्मविश्वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर परमेश्वरावरील विश्वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्वास होय.
- जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजेनाम.
परमेश्वराच्या
नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक
गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवूनआणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही
त्यांनी प्रवचनातून सांगितले.
प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल
भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले की, जीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा
बाळगू नका..
भगवंताला
विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्वास
असावा पुरता ..”
स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते
- दंगल वाघ, धुळे
माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.
१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.
एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.
मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.
मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.
रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!
माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥
00:10
samirsinh dattopadhye
स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते
- दंगल वाघ, धुळे
माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.
१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.
एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.
मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.
मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.
रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!
माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥
Sadguru Shree Aniruddha Bapu visited Dhule on 18 th February 2007.
All Shraddhavans in the city of Dhule were excited and waiting with bated breath to see their Sadguru.
Bapu's discourse was held at 'Dhule Zilla Krida Sankul' which was filled to capacity.
People from far off places had come to witness this event and to hear their Sadguru's nectar filled words.
People from far off places had come to witness this event and to hear their Sadguru's nectar filled words.
The event was a grand one and each and every Shraddhavn left the venue satiated with joy.
00:08
samirsinh dattopadhye
Sadguru Shree Aniruddha Bapu visited Dhule on 18 th February 2007.
All Shraddhavans in the city of Dhule were excited and waiting with bated breath to see their Sadguru.
Bapu's discourse was held at 'Dhule Zilla Krida Sankul' which was filled to capacity.
People from far off places had come to witness this event and to hear their Sadguru's nectar filled words.
People from far off places had come to witness this event and to hear their Sadguru's nectar filled words.
The event was a grand one and each and every Shraddhavn left the venue satiated with joy.
Saturday 28 June 2014
- सुनंदावीरा बर्हाटे, जळगाव
बाहेरगावच्या श्रद्धावानांसाठी ‘बापू आमच्या गावी येणार’ म्हणजे तो आनंदोत्सवच असतो. मग अशा ह्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी तेथील प्रत्येक श्रद्धावान आसुसलेला असतो. अशावेळी एखाद्या श्रद्धावानाच्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि त्याला वाटते की आपण ह्या आनंदोत्सवाला मुकणार की काय ? पण ती सद्गुरु माऊली असं होऊ देत नाही...
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.
दिनांक १० ऑक्टोबरला मला माझ्या नणंदेच्या शेताच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी यावल ह्या गावी जावे लागले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं टू-व्हीलरवरून यावल गावी गेलो. तिकडून परत येत असतांना नशिराबाद गावाजवळ आमची गाडी स्लिप झाली. मी पडले आणि डोकं आपटल्यामुळे बेशुद्ध झाले. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली.
लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडले. मी थोड्या वेळातच शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच प्रथम मला आठवण झाली माझ्या पर्सची. त्या पर्समध्ये शेताच्या व्यवहाराची रक्कम होती. तिचे काय झाले असेल ह्याची धाकधूक होतीच. मी पर्स शोधली, तर ती एका बाजूला पडलेली होती. मी माझ्या मिस्टरांना हाताने पर्स दाखविली. त्यांनी ती पर्स लगेच उचलून त्यातली रक्कम तपासून घेतली. सद्गुरु बापूंच्या कृपेमुळे सर्व रक्कम सुरक्षित होती.
रक्कम सुरक्षित असल्याचे पाहिल्यावर आता लक्ष मला झालेल्या इजेकडे गेले. माझ्या डोळ्याला एक इंचाची जखम झालेली होती आणि पाठीला खरचटलेले होते. लोक म्हणत होते की आम्ही तुम्हाला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये नेतो. परंतु मी म्हटले, ‘‘मला थोडा वेळ शांत बसू द्या.’’ १५-२० मिनिटांनी आम्ही आमच्याच गाडीवरून हॉस्पिटलमध्ये गेलो. नंतर घरी गेलो.
मला सारखे वाटत होते की आता पाच दिवसांनी बापू येणार, मग आपल्या ह्या अवस्थेत आपल्याला सेवेला जाता येणार की नाही? परंतु त्या अकारण करुणामयी सद्गुरुतत्त्वाने मला ह्या पाचच दिवसांमध्ये बरे केले व मला आनंदोत्सवाचा आनंद मिळवून दिला.
बापूंनी मला आणि शेताच्या रक्कमेला सुरक्षितपणे घरी पोहचविले. खरंच! बापू प्रत्येक भक्ताची किती काळजी घेत असतात!
अशा ह्या आपल्या सद्गुरु बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम!!
असाच माझा दुसरा अनुभव. २००६ साली बापूंनी ‘श्रीवर्धमान व्रताधिराजा’ची घोषणा केली. तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांना दरवर्षी वर्धमान व्रत करायला सांगत असे. परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये शांती, साखरपुडा, व्रतवैकल्यं ह्यांसारखे खूप कार्यक्रम असतात. त्यामुळे वर्धमानव्रतामध्ये पाळावयाचे तूरडाळ, चणाडाळ ह्यांचे पथ्य पाळले जाणार नाही म्हणून ते वर्धमानव्रत करीत नसत.
२०१२ साली मी त्यांना कळकळीने सांगितले की ह्यावर्षी वर्धमानव्रत कराच. त्यांनीही व्रतकाळातील पथ्य न पाळू शकण्याचे भय बाजूला ठेवून अगदी मनापासून वर्धमानव्रत केले आणि मुख्य म्हणजे पथ्यही पाळले.
मिस्टरांनी पहिल्यांदाच व्रताधिराजाचे पालन केले म्हणून मला आनंद तर झालाच. पण खरं तर हे पालन बापुरायानेच त्यांच्याकडून करून घेतले होते - त्यांच्यावर ओढवू घातलेल्या संकटामध्ये त्यांना कवच प्रदान करण्यासाठी, हे आमच्या नंतर लक्षात आले.
वर्धमानव्रताचे उद्यापन झाल्यानंतर दोन दिवसांनी माझे मिस्टर रात्री नऊ वाजता टी.व्ही. पाहत होते. टी.व्ही. पाहता पाहता ते अचानक कॉटवरून खाली पडले. मला एकदम आवाज आला म्हणून मी लगेच तिथे आले. पाहिले तर काय? त्यांना कसलीच शुद्ध नव्हती आणि डोळेही एकदम उघडे पडलेले. मी तर घाबरूनच गेले.
मी त्यांचे डोळे दाबून धरले आणि मुलांना आवाज दिला. ही अशी कोणाची अवस्था आम्ही प्रथमच पाहत होतो. आम्ही त्यांना हलवून उठवत होतो, तरी त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आता काय होणार, ह्या विचाराने आमचा जीव भेदरून गेला होता.
मी मुलाला लगेच आमच्या घरातील आपल्या संस्थेची उदी आणायला सांगितली. ही उदी त्यांच्या छातीला-कपाळाला लावली. थोडी उदी तोंडामध्ये टाकली.
....आणि थोड्याच वेळात ते शुद्धीवर आले!
त्यांनी आम्हांला विचारले, ‘‘मला काय झाले होते? बरे झाले मी वर्धमानव्रत केले. त्यामुळे आज माझे आयुष्य वर्धमान झाले.’’
आम्ही सर्व बापूभक्त येता-जाता, दुःखात-आनंदात, सोयर-सुतकात उदी लावत राहतो. ही उदी आम्हाला संकटामध्ये कवच प्रदान करते. त्यामुळे आपल्यावरील येणार्या संकटांची तीव्रता कमी होते. ह्या प्रसंगात उदीने औषधाचे काम केले आणि आमच्यावर आलेले संकट टळले. खरंच, ‘कलियुग में एक ही त्राता| अनिरुद्धराम रे’.
परमपूज्य बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम !!!
असा सद्गुरु आम्हाला जन्मोजन्मी मिळो!
04:52
samirsinh dattopadhye
- सुनंदावीरा बर्हाटे, जळगाव
बाहेरगावच्या श्रद्धावानांसाठी ‘बापू आमच्या गावी येणार’ म्हणजे तो आनंदोत्सवच असतो. मग अशा ह्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी तेथील प्रत्येक श्रद्धावान आसुसलेला असतो. अशावेळी एखाद्या श्रद्धावानाच्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि त्याला वाटते की आपण ह्या आनंदोत्सवाला मुकणार की काय ? पण ती सद्गुरु माऊली असं होऊ देत नाही...
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.
दिनांक १० ऑक्टोबरला मला माझ्या नणंदेच्या शेताच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी यावल ह्या गावी जावे लागले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं टू-व्हीलरवरून यावल गावी गेलो. तिकडून परत येत असतांना नशिराबाद गावाजवळ आमची गाडी स्लिप झाली. मी पडले आणि डोकं आपटल्यामुळे बेशुद्ध झाले. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली.
लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडले. मी थोड्या वेळातच शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच प्रथम मला आठवण झाली माझ्या पर्सची. त्या पर्समध्ये शेताच्या व्यवहाराची रक्कम होती. तिचे काय झाले असेल ह्याची धाकधूक होतीच. मी पर्स शोधली, तर ती एका बाजूला पडलेली होती. मी माझ्या मिस्टरांना हाताने पर्स दाखविली. त्यांनी ती पर्स लगेच उचलून त्यातली रक्कम तपासून घेतली. सद्गुरु बापूंच्या कृपेमुळे सर्व रक्कम सुरक्षित होती.
रक्कम सुरक्षित असल्याचे पाहिल्यावर आता लक्ष मला झालेल्या इजेकडे गेले. माझ्या डोळ्याला एक इंचाची जखम झालेली होती आणि पाठीला खरचटलेले होते. लोक म्हणत होते की आम्ही तुम्हाला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये नेतो. परंतु मी म्हटले, ‘‘मला थोडा वेळ शांत बसू द्या.’’ १५-२० मिनिटांनी आम्ही आमच्याच गाडीवरून हॉस्पिटलमध्ये गेलो. नंतर घरी गेलो.
मला सारखे वाटत होते की आता पाच दिवसांनी बापू येणार, मग आपल्या ह्या अवस्थेत आपल्याला सेवेला जाता येणार की नाही? परंतु त्या अकारण करुणामयी सद्गुरुतत्त्वाने मला ह्या पाचच दिवसांमध्ये बरे केले व मला आनंदोत्सवाचा आनंद मिळवून दिला.
बापूंनी मला आणि शेताच्या रक्कमेला सुरक्षितपणे घरी पोहचविले. खरंच! बापू प्रत्येक भक्ताची किती काळजी घेत असतात!
अशा ह्या आपल्या सद्गुरु बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम!!
असाच माझा दुसरा अनुभव. २००६ साली बापूंनी ‘श्रीवर्धमान व्रताधिराजा’ची घोषणा केली. तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांना दरवर्षी वर्धमान व्रत करायला सांगत असे. परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये शांती, साखरपुडा, व्रतवैकल्यं ह्यांसारखे खूप कार्यक्रम असतात. त्यामुळे वर्धमानव्रतामध्ये पाळावयाचे तूरडाळ, चणाडाळ ह्यांचे पथ्य पाळले जाणार नाही म्हणून ते वर्धमानव्रत करीत नसत.
२०१२ साली मी त्यांना कळकळीने सांगितले की ह्यावर्षी वर्धमानव्रत कराच. त्यांनीही व्रतकाळातील पथ्य न पाळू शकण्याचे भय बाजूला ठेवून अगदी मनापासून वर्धमानव्रत केले आणि मुख्य म्हणजे पथ्यही पाळले.
मिस्टरांनी पहिल्यांदाच व्रताधिराजाचे पालन केले म्हणून मला आनंद तर झालाच. पण खरं तर हे पालन बापुरायानेच त्यांच्याकडून करून घेतले होते - त्यांच्यावर ओढवू घातलेल्या संकटामध्ये त्यांना कवच प्रदान करण्यासाठी, हे आमच्या नंतर लक्षात आले.
वर्धमानव्रताचे उद्यापन झाल्यानंतर दोन दिवसांनी माझे मिस्टर रात्री नऊ वाजता टी.व्ही. पाहत होते. टी.व्ही. पाहता पाहता ते अचानक कॉटवरून खाली पडले. मला एकदम आवाज आला म्हणून मी लगेच तिथे आले. पाहिले तर काय? त्यांना कसलीच शुद्ध नव्हती आणि डोळेही एकदम उघडे पडलेले. मी तर घाबरूनच गेले.
मी त्यांचे डोळे दाबून धरले आणि मुलांना आवाज दिला. ही अशी कोणाची अवस्था आम्ही प्रथमच पाहत होतो. आम्ही त्यांना हलवून उठवत होतो, तरी त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आता काय होणार, ह्या विचाराने आमचा जीव भेदरून गेला होता.
मी मुलाला लगेच आमच्या घरातील आपल्या संस्थेची उदी आणायला सांगितली. ही उदी त्यांच्या छातीला-कपाळाला लावली. थोडी उदी तोंडामध्ये टाकली.
....आणि थोड्याच वेळात ते शुद्धीवर आले!
त्यांनी आम्हांला विचारले, ‘‘मला काय झाले होते? बरे झाले मी वर्धमानव्रत केले. त्यामुळे आज माझे आयुष्य वर्धमान झाले.’’
आम्ही सर्व बापूभक्त येता-जाता, दुःखात-आनंदात, सोयर-सुतकात उदी लावत राहतो. ही उदी आम्हाला संकटामध्ये कवच प्रदान करते. त्यामुळे आपल्यावरील येणार्या संकटांची तीव्रता कमी होते. ह्या प्रसंगात उदीने औषधाचे काम केले आणि आमच्यावर आलेले संकट टळले. खरंच, ‘कलियुग में एक ही त्राता| अनिरुद्धराम रे’.
परमपूज्य बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम !!!
असा सद्गुरु आम्हाला जन्मोजन्मी मिळो!
Subscribe to:
Posts (Atom)